माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील सध्या आपल्या टॅटूमुळे चर्चेत आहेत. नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर चक्क राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू काढला आहे. ‘देवेंद्र’ असा टॅटू आपल्या मनगटावर काढला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. (Narendra Patil has a tattoo name of Devendra on his hand)
“आमच्या ह्रदयात, ओठावर देवेंद्र आहेत. फक्त अधिकृतपणे आता टॅटू काढला आहे. त्यामुळे ज्याच्या हातावर आणि ओठावर देवेंद्र आहे त्याने हातावर काढला आहे. एक आठवडा आधी पाटणच्या दौऱ्यावर असताना मी हा टॅटू काढला,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. “मी तर आधी ह्रदयावर काढणार होतो. पण म्हटलं आधी हातावर किती वेदना होतात ते सहन करु आणि वेळ आली तर ह्रदयावर काढू,” असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधानांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांशी ते संपर्कात असतात. पाटण दौऱ्यात ते पूरग्रस्तांसोबत मांडीला मांडी लावून जेवायला बसले होते. देशपातळीवरचा नेता एका सामान्य पूरग्रस्तासोबत मांडीला मांडी लावून तो जे खातोय तेच खात आहे हे पाहून माझं मन भरलं. यापेक्षा दुसरा कोणता मोठा नेता आहे असं मला वाटलं”.
“महाराष्ट्रात राज्याचा प्रमुख महत्वाचा मानला जातो. आमच्या कामगार चळवळीत गेले १५ ते २० वर्ष माथाडी कामगारांना आपलं समजणारा योग्य मुख्यमंत्री मिळालाच नाही. २०१६ रोजी सर्वात प्रथम फडणवीसांकडे माथाडी कामगारांचे प्रश्न मांडले तेव्हा खूप आत्मियता, जिव्हाळा निर्माण झाला. त्यांनी प्राथमिकतेने ते प्रश्न सोडवले. मराठा आरक्षणातही फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे. मराठा नसतानाही मराठा समाजातील गरिबांसाठी स्नेह, प्रेम हे पाहिल्यानंतर महाराष्ट्राला हे नेतृत्व १०-१५ वर्षांपूर्वी मिळालं असतं तर नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळाला असता,” असं नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. (Narendra Patil has a tattoo name of Devendra on his hand)
==========================================================================================================
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका,… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणअंतरवाली सराटी (जालना), १७ मे २०२६: मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर असलेले नेते मनोज… Read more: मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
