Reliance Industries AGM | ऊर्जा व्यवसायात पदार्पन, मोठ्या घोषणा,परंतु गुंतवणूकदारांना तोटा

Reliance Industries AGM | ऊर्जा व्यवसायात पदार्पन, मोठ्या घोषणा,परंतु  गुंतवणूकदारांना तोटा

Online Team | देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. Reliance Industries AGM रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे की, त्यांची रिलायन्स रिटेल पुढील तीन वर्षांत दहा लाखाहून अधिक रोजगार निर्माण करेल. एजीएम दरम्यान मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स रिटेलची वाढ तीन ते पाच वर्षात 3 पट जास्त होईल. किंबहुना डिजीटलनंतर आता मुकेश अंबानी यांचे लक्ष रिटेल व्यवसाय वाढवण्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही केली आहे. एजीएममध्ये, मुकेश अंबानी यांनी ऊर्जा क्षेत्रातही महासत्ता बनण्याबाबत बिगुल वाजवले. Reliance company will create 10 lakh jobs in three years

ऊर्जा व्यवसायात प्रचंड गुंतवणूक
रिटेल व्यतिरिक्त रिलायन्सने ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा Reliance Industries AGM केली आहे. कंपनी गुजरातमधील जामनगरमध्ये धीरूभाई अंबानी गीगा कॉम्प्लेक्स तयार करेल. यावर्षी कंपनी नवीन उर्जा व्यवसाया(New Energy Business)ची घोषणा करेल. रिलायन्स रिन्यूएबल एनर्जीमध्ये 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. आम्ही चार गीगा कारखान्यांनाGiga factories) आधार देण्यासाठी पायाभूत सुविधा व साहित्य पुरवू, असे ते म्हणाले.

जामनगर कॉम्प्लेक्स या गीगा कारखान्यांना आधार देण्यासाठी आवश्यक सामग्री व उपकरणे तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा व उपयोगिता पुरवेल, जेणेकरुन सर्व महत्वपूर्ण साहित्य वेळेवर उपलब्ध होईल. त्याचबरोबर, कंपनी सौरऊर्जेद्वारे स्वस्त मॉड्युल देईल. कंपनीने सौरऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. वर्ष 2030 पर्यंत कंपनी 100 जीडब्ल्यू उर्जा क्षमता तयार करेल. कंपनी बॅटरीमध्ये सौर उर्जा साठवण्यावर लक्ष केंद्रित करत राहील. नवीन ऊर्जा व्यवसायात कंपनी 3 वर्षात 75000 कोटींची गुंतवणूक करेल. Reliance Industries AGM

मोठ्या घोषणांचा परिणाम नाही
रिलायन्सच्या एजीएममध्ये Reliance Industries AGM केलेल्या मोठ्या घोषणांचा फायदा गुंतवणूकदारांना झाला नाही. वास्तविक, एजीएमनंतर रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घट झाली आहे. कंपनीची मार्केट कॅप 13 लाख 87 हजार 952 कोटी रुपयांवर बंद झाली. या घसरणीमुळे रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना आज सुमारे 33,522 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

हे ही वाचा ———————-

<

Related posts

Leave a Comment