Online Team | प्रधानमंत्री फळपीक विमा योजना Pradhan Mantri Fruit Crop Insurance Scheme सुरु झाली आहे. कृषी विभागाने अधिसुचीत केलेल्या महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी मृग बहारातील सिताफळ, डाळिंब, चिकु, मोसंबी, लिंबु, पेरु, संत्रा या फळपिकांचे शेतकऱ्यांनी विमा उतरवावा असे अवाहन करण्यात आले आहे.
फळपिकांचे अतीपाऊस, वादळ, गारपीट व इतर नैसर्गिक कारणाने नुकसान झाले तर शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडून मृग बहारासाठी पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबवण्याला शासनाने मान्यता दिली आहे. योजनेत यंदा बीड जिल्ह्यासाठी संत्रा, मोसंबी,लिंबु, पेरु, सिताफळ, डाळिंब, चिकु, याफळपिकांचा समावेश आहे. योजनेत सहभागासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. योजनेत सहभाग हा एच्छिक आहे. Take out insurance of fruit farming, Department of Agriculture appeals to farmers
मात्र जे कर्जदार विहीत मुदतीत सहभागी न होण्याबाबत बॅंकाना कळवणार नाहीत असे शेतकऱी योजनेत सहभागी आहेत असे समजून सबंधित शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहीत पद्धतीने कर्ज खात्यातून कपात केला जाईल. त्यासाठी अंतीम तारखेच्या किमान सात दिवस आधी बॅकेला हप्ता न कापण्याबाबत कळवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधारकार्ड, किंवा आधार नोंदणी प्रत, सातबारा, बॅकपासबुकीची प्रत, तसेच फळपिकांचे जियो टॅगिंग केलेले फोटो व अधिसुचित असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र, सादर करुन विमा योजनेत सहभागी होण्याचे अवाहन कृषी विभागाने केले आहे. Take out insurance of fruit farming, Department of Agriculture appeals to farmers
अशी आहे फळपीक विमा भरण्याची अंतीम तारीखसंत्रा, मोसंबी, पेरु, चिकु, लिंबू ः 30 जून, – डाळिंब ः 14 जुलै, सिताफळ ः 31 जुलै हेक्टरी हप्ता ः संत्रा ः 4 हजार, मोसंबी ः 6 हजार रुपये, पेरु व चिकु प्रत्येकी ः 3 हजार रुपये, लिंबु7 हजार रुपये, डाळिंब 6 हजार 500 रुपये व सिताफळ 3 हजार 300 रुपये.
हे ही वाचा ः
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील… Read more: जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका,… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
