कुठलंही सरकार काम करायचं म्हटलं की, ‘आधार कार्ड’ आलंच! Aadhaar आधार कार्डाशिवाय कुठलंच काम आता होत नाही, इतकं नक्की. आपल्या मोबाईलच्या साध्या सिमकार्ड खरेदी पासून ते आता अगदी कोरोना लसीकरणापर्यंत ‘आधार कार्ड’च आपल्याला आधार ठरतं. कुठलीही सरकारी योजना आधार कार्डाशिवाय पूर्णच होत नाही. आधार कार्ड म्हणजे आपली अधिकृत ओळख असते.
ठिकठिकाणी आपल्याला आधार कार्ड लागतंच! ते जर हरवलं अथवा गहाळ झालं तर आपली बरीचशी आवश्यक अशी कामे निश्चितपणे अडतात. या आधार कार्डमध्ये काही चुका असल्या तरीही बराच घोळ होतो. एखाद्या ठिकाणी कागदोपत्री कामासाठी गेल्यास त्याठिकाणी आपले आधार कार्ड नसेल तर मोठा खोळंबा होतो. मात्र, आता या सगळ्याच तक्रारी दूर होण्याच्या मार्गावर आहेत. चुटकीसरशी यातली एक नि एक तक्रार आता दूर होणार आहे.
To experience the new and updated features and services in the #mAadhaar app, uninstall any previously installed versions. Download the latest version from: https://t.co/62MEOeR7Ff (Android) https://t.co/GkwPFzuxPQ (iOS) pic.twitter.com/U3vOVovDUR
— Aadhaar (@UIDAI) June 8, 2021
या सगळ्याच समस्या आपण घरबसल्या कुठेही न जाता सहजपणे सोडवू शकणार आहोत. याचं कारण आहे mAadhaar App! हे ऍप जर आपल्याकडे नसेल तर ते आत्ताच डाऊनलोड करा. जर ते आधीपासूनच असेल तर ते अपडेट करा. कारण आता या ऍपचे नवे अपडेट आपला वेळ वाचवणारं ठरणार आहे.
UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट आणले आहे. या अपडेटमुळे अनेक गोष्टी सहजसोप्या होणार आहेत. मात्र, हे ऍप घेताना आपल्याला बनावट आणि खोट्या ऍप्सपासून सावधान राहणं गरजेचं आहे. हे ऍप कुठूनही डाऊनलोड करु नका. ते डाऊनलोड करण्यासाठी UIDAI ने दिलेल्या अधिकृत लिंकवरुनच आधारचे हे खरे ऍप आपल्याला डाऊनलोड करता येईल.
महत्वाच्या बातम्या ===========
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state? चालू मान्सून हंगामात महाराष्ट्रात… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय वळण घेतले… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी सायंकाळी साखरपुड्याच्या… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध केमिस्ट्री शिक्षक… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत

