पिक विमा भरण्याची मुदत आज संपत आहे.ही मुदत वाढवून देण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू आहेत.पण मुदत वाढल्याने विमा भरण्यासाठी गर्दी वाढेल असं अजिबात नाही. Farmers are not intrst on crop insurance scheme कारण विमा कंपन्यांनी शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे.त्यांना फसवलं आहे.गेल्या वर्षी शेतकर्यांच मोठं नुकसान झालं.. तरीही विमा कंपन्यांनी शेतकर्यांना दमडी देखील दिली नाही.. सोयाबीनच्या नुकसानीचे ऑनलाईन फोटो दोन दिवसात पाठवा असे फर्मान विमा कंपन्यांनी काढले.. फोटो पाठविणार्या शेतकर्यांची संख्या हातच्या बोटावर मोजण्या एवढी देखील नाही.. त्यांना नुकसान मिळाले.. ज्यांनी पाठविले नाहीत ते वंचित राहिले.. केवळ तांत्रिक मुद्दे उपस्थित करून शेतकर्यांना लुटण्याचा हा डाव होता.एकाच सर्व्हे नंबर मधील एका शेतकर्यांच नुकसान झालं आणि दुसर्याच नाही असं होत नाही.. पण तसं झालं.. बीड पॅटर्न म्हणून ज्याचा नाहक गवगवा केला गेला त्या बीडची ही कथा आहे..
खरं तर या लुटमारीवर लोकप़तिनिधीं व शेतकरी संघटनांनी अंकुश ठेवायला हवा होता.. आवाज उठवायला हवा होता.. दुर्दैवाने हा वर्ग गप्प आहे.. कारण असं सांगितलं जातं की, यातील बहुसंख्य विमा कंपन्यांचे लाभार्थी आहेत..त्यामुळे विमा सोडून बोला असं म्हणण्यासारखी स्थिती आहे.. महाराष्ट्रात गेली आठ दिवस ब्रा वर जेवढी चर्चा सुरू आहे तेवढी चर्चा विम्यावर झाली असती तर हजारो शेतकर्यांचे कोटकल्याण झाले असते.. Farmers are not intrst on crop insurance scheme
दिवसा ढवळया अशी लूट सुरू असेल तर शेतकरयांनी का विमा भरावा? खरं तर शेतकरी पीक विमा योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी झाली असती तर शेतकर्यांच्या मागची साडेसाती काही प़माणात तरी कमी झाली असती.. मात्र ती कमी व्हावी अस राजसत्तेला आणि हितसंबंधीयांना वाटतच नसल्याने एवढी लूट सुरू असताना एकही मायचापूत या विषयावर बोलत नाही.. या मौनामागचं गूढ आपण समजून घेतलं पाहिजे. Farmers are not intrst on crop insurance scheme
हे ही वाचा —————————–
- Birdev Done UPSC मेंढपाळचा मुलगा ते आय पी एस अधिकारी संघर्ष चा येळकोट येळकोट करणारा बिरदेव डोणे कोण आहेWho is Birdev Done, the Mendpal son who succeeded in UPSC? देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे … Read more
- Pahalgam terrorist attack | जम्मू काश्मीर पहलगाम हल्ल्यात 26 पर्याटक ठार, महाराष्ट्रातील सहा जण – वाचा सविस्तरजम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ नागरिक, ज्यात बहुतेक पर्यटक … Read more
- क्रिकेट क्षेत्रात खळबळ; लिंग परिवर्तन केलेला आर्यन किंवा अनाया बांगर पुन्हा चर्चेत, लालनटॉप दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोपअनाया बांगरने अलीकडेच भारतीय पुरुष क्रिकेट परिसंस्था स्त्रीमध्ये रूपांतरित होण्याच्या काळात अप्रिय आणि प्रतिकूल असल्याचा दावा … Read more
- प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची प्रशासनातील लुडबुड, सिईओ यांना खटकली ?जालना जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शालार्थ समन्वयक म्हणून काम करत असलेल्या चंद्रकांत … Read more
- काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? विरोधकांचा त्याला का विरोध आहे?बुधवारी वादग्रस्त वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरून केंद्र आणि विरोधी पक्षांमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता संसदेत आहे. संसदेच्या कनिष्ठ … Read more