Farmer Crop Insurance Scheme | शेतकरी पिक विमा योजनेकडे यंदा शेतकर्यांनीच पाठ फिरविली.
पिक विमा भरण्याची मुदत आज संपत आहे.ही मुदत वाढवून देण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू आहेत.पण मुदत वाढल्याने विमा भरण्यासाठी गर्दी वाढेल असं अजिबात नाही. Farmers are not intrst on crop insurance scheme कारण विमा कंपन्यांनी शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे.त्यांना फसवलं आहे.गेल्या वर्षी शेतकर्यांच मोठं नुकसान झालं.. तरीही विमा कंपन्यांनी शेतकर्यांना दमडी देखील दिली नाही.. सोयाबीनच्या नुकसानीचे ऑनलाईन फोटो दोन दिवसात पाठवा असे फर्मान विमा कंपन्यांनी काढले.. फोटो पाठविणार्या शेतकर्यांची संख्या हातच्या बोटावर मोजण्या एवढी देखील नाही.. त्यांना नुकसान मिळाले.. ज्यांनी पाठविले नाहीत ते वंचित राहिले.. केवळ तांत्रिक मुद्दे उपस्थित करून शेतकर्यांना लुटण्याचा हा डाव होता.एकाच सर्व्हे नंबर मधील एका शेतकर्यांच नुकसान झालं आणि दुसर्याच नाही असं होत नाही.. पण तसं झालं.. बीड पॅटर्न म्हणून ज्याचा नाहक गवगवा केला गेला त्या बीडची ही कथा आहे..
खरं तर या लुटमारीवर लोकप़तिनिधीं व शेतकरी संघटनांनी अंकुश ठेवायला हवा होता.. आवाज उठवायला हवा होता.. दुर्दैवाने हा वर्ग गप्प आहे.. कारण असं सांगितलं जातं की, यातील बहुसंख्य विमा कंपन्यांचे लाभार्थी आहेत..त्यामुळे विमा सोडून बोला असं म्हणण्यासारखी स्थिती आहे.. महाराष्ट्रात गेली आठ दिवस ब्रा वर जेवढी चर्चा सुरू आहे तेवढी चर्चा विम्यावर झाली असती तर हजारो शेतकर्यांचे कोटकल्याण झाले असते.. Farmers are not intrst on crop insurance scheme
दिवसा ढवळया अशी लूट सुरू असेल तर शेतकरयांनी का विमा भरावा? खरं तर शेतकरी पीक विमा योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी झाली असती तर शेतकर्यांच्या मागची साडेसाती काही प़माणात तरी कमी झाली असती.. मात्र ती कमी व्हावी अस राजसत्तेला आणि हितसंबंधीयांना वाटतच नसल्याने एवढी लूट सुरू असताना एकही मायचापूत या विषयावर बोलत नाही.. या मौनामागचं गूढ आपण समजून घेतलं पाहिजे. Farmers are not intrst on crop insurance scheme
हे ही वाचा —————————–
- शिवराय सर्वांचे, फूट कुणाची? अंजनगाव वादातून महाराष्ट्राला धडा,अनधिकृत पुतळे, जातीय तणाव आणि शिवभक्तीची खरी परीक्षा
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद केवळ - समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३१ दिवसांचे आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन पुर्णत्वाची प्रतीक्षा, भर उन्हाळ्यात ३३०० कर्मचारी ‘हक्क’साठी रस्त्यावर
मुंबई, ८ एप्रिल २०२६ : महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या न्याय्य मागण्यांकडे - इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!
भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – - ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळा
जालना, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – जिल्हा परिषद जालना, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आज येथील - बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेची धक्कादायक हकालपट्टी! हिंसक भाषा आणि धमकीमुळे घराबाहेर
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२६: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मध्ये एक

