Farmer Crop Insurance Scheme | शेतकरी पिक विमा योजनेकडे यंदा शेतकर्यांनीच पाठ फिरविली.
पिक विमा भरण्याची मुदत आज संपत आहे.ही मुदत वाढवून देण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू आहेत.पण मुदत वाढल्याने विमा भरण्यासाठी गर्दी वाढेल असं अजिबात नाही. Farmers are not intrst on crop insurance scheme कारण विमा कंपन्यांनी शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे.त्यांना फसवलं आहे.गेल्या वर्षी शेतकर्यांच मोठं नुकसान झालं.. तरीही विमा कंपन्यांनी शेतकर्यांना दमडी देखील दिली नाही.. सोयाबीनच्या नुकसानीचे ऑनलाईन फोटो दोन दिवसात पाठवा असे फर्मान विमा कंपन्यांनी काढले.. फोटो पाठविणार्या शेतकर्यांची संख्या हातच्या बोटावर मोजण्या एवढी देखील नाही.. त्यांना नुकसान मिळाले.. ज्यांनी पाठविले नाहीत ते वंचित राहिले.. केवळ तांत्रिक मुद्दे उपस्थित करून शेतकर्यांना लुटण्याचा हा डाव होता.एकाच सर्व्हे नंबर मधील एका शेतकर्यांच नुकसान झालं आणि दुसर्याच नाही असं होत नाही.. पण तसं झालं.. बीड पॅटर्न म्हणून ज्याचा नाहक गवगवा केला गेला त्या बीडची ही कथा आहे..
खरं तर या लुटमारीवर लोकप़तिनिधीं व शेतकरी संघटनांनी अंकुश ठेवायला हवा होता.. आवाज उठवायला हवा होता.. दुर्दैवाने हा वर्ग गप्प आहे.. कारण असं सांगितलं जातं की, यातील बहुसंख्य विमा कंपन्यांचे लाभार्थी आहेत..त्यामुळे विमा सोडून बोला असं म्हणण्यासारखी स्थिती आहे.. महाराष्ट्रात गेली आठ दिवस ब्रा वर जेवढी चर्चा सुरू आहे तेवढी चर्चा विम्यावर झाली असती तर हजारो शेतकर्यांचे कोटकल्याण झाले असते.. Farmers are not intrst on crop insurance scheme
दिवसा ढवळया अशी लूट सुरू असेल तर शेतकरयांनी का विमा भरावा? खरं तर शेतकरी पीक विमा योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी झाली असती तर शेतकर्यांच्या मागची साडेसाती काही प़माणात तरी कमी झाली असती.. मात्र ती कमी व्हावी अस राजसत्तेला आणि हितसंबंधीयांना वाटतच नसल्याने एवढी लूट सुरू असताना एकही मायचापूत या विषयावर बोलत नाही.. या मौनामागचं गूढ आपण समजून घेतलं पाहिजे. Farmers are not intrst on crop insurance scheme
हे ही वाचा —————————–
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims राज्यातील अतिवृष्टीमुळे लाखों शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः
- India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर“I wanted to boxing him…”: Pakistani spinner Abrar Ahmed’s controversial statement on Shikhar Dhanu, angers Indian
- आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!दुबई, 28 सप्टेंबर 2025: आशिया चषक 2025 (T20I स्वरूप) चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात
- मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसानMarathwada Reels Under Torrential Rains and Floods: Massive Crop Damage Reported मुंबई, २ ऑक्टोबर २०२५: महाराष्ट्रातील
- निसर्ग संवर्धनासाठी माहूरमध्ये होत आहे पर्यावरण संमेलन; अशी करा नाव नोंदणीEnvironment conference organized at Mahur for nature conservation; presence of Padma Shri Shabir Mamu माहूर, १