मुंबई ः कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेल्या तसेच आॅक्सीजन खाटांचा वापर यावर आधारीत सरकारने राज्यातील जिल्ह्यांचे चार गट पाडले आहे. त्यात पहिल्या गटातील दहा जिल्ह्यात सोमवारपासून बऱ्यापैकी खुले होणार आहे. दुसऱ्या गटात सर्व दुकाने व खाजगी सुरु राहणार आहेत तर माॅल 50 टक्के सुरु राहतील. तिसऱ्या गटात माॅल बंद राहतील. दुकाने व खाजगी कार्यालये दुपारी चार वाजेपर्यत सुरु राहतील तर चौथ्या गटात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहिल. तेथे संचारबंदी कायम असेल. माॅल बंदच राहतील असे मार्गदर्शक तत्वे सरकारने दिली आहेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदेश काढतील,.
कोरोना संसर्गाची बाधा होऊन रुग्णसंख्या वाढत असल्याने लाॅकडाऊन करण्यात आले होते. आता महाराष्ट्रातील बहूतांश जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अनलाॅकच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे केली आहेत.
त्यानुसार पहिल्या गटात पाॅझिटीव्हीटी दर पाच टक्क्यापेक्षा कमी व उपलब्ध आॅक्सीजनचा बेडचा वापर 25 टक्क्यापेक्षा कमी होतोय, दुसऱ्या गटात पाॅझिटीव्हीटी दर पाच टक्क्यापेक्षा कमी व आॅक्सीजनचा बेडचा वापर 25 ते 40 टक्के होतोय, तिसऱ्या गटात पाॅझिटीव्हीटी दर पाच ते दहा टक्के टक्के व उपलब्ध आॅक्सीजनचा बेड 40 टक्क्यापेक्षा अधिक भरलेले असतील, व चौथ्या गटात पाॅझिटीव्हीटी दर 10 ते 20 टक्के असेल व उपलब्ध आॅक्सीजनचा बेड 60 टक्क्यापेक्षा अधिक भरलेले असतील.
शासनाने केलेल्या गटानुसार पहिल्या गटातील धुळे, जळगाव, जालना, नगर, लातुर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपुर, नागपुर, गोंदीया या जिल्ह्यात कोरोना नियमाचे पालन करत बऱ्यापैकी लाॅकडाऊन खुले होईल व व्यवहार सुरु होतील. दुसऱ्या गटात नंदुरबार व हिंगोली जिल्हे आहे.
तिसऱ्या गटात गडचिरोली, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, परभणी, बीड, उस्मानाबाद, पालघर, ठाणे, नाशिक, औंरंगाबाद, मुंबई, तर चौथ्या गटात सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी, रायगड, बुलढाणा, सातारा हे जिल्हे आहेत. लाॅकडाऊनमध्ये शिथीलता आली असली तरी लग्नसमारंभ, अत्यविधी व अन्य कार्यक्रमात कोरोनाबाबतचे निर्बंध पाळावे लागणार आहेत.
हे ही वाचा
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state? चालू मान्सून हंगामात महाराष्ट्रात कमालीची टोकाची परिस्थिती… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय वळण घेतले आहे. या हायप्रोफाइल… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ६ लाख… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी सायंकाळी साखरपुड्याच्या वऱ्हाडातील भरलेल्या टेम्पोला… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध केमिस्ट्री शिक्षक आणि आरसीसी कोचिंगचे… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत





