मुंबई:– महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तब्बल अडीच तास या प्रकरणावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर उद्या सुनावणी करणार असल्याचं सांगितलं. कोर्टातील या युक्तिवादानंतर कायदे तज्ज्ञांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांनीही संविधानातील मूलभूत गोष्टींकडे लक्ष वेधत आजच्या सुनावणीवर भाष्य केलं. दोन तृतियांश लोक गेले तर ते वाचू शकतात. पण यावेळी मर्जर शब्द वापरला गेलाय. राज्यघटनेत मर्जर शब्द वापरलेला आहे. शिंदे गटाने अजूनही कोणत्याही पक्षात स्वत:ला विलीन करून घेतलेलं नाही. त्यामुळे ते अपक्ष आहे की नाही याचा निर्णय…
Read MoreCategory: राजकारण
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत
नांदेड : मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आरक्षणाची सोडत सुधारित कार्यक्रमानुसार गुरुवार २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथील प्रेक्षागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी कळविले आहे. तसेच जिल्ह्यातील किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर या तालुका मुख्यालयी गुरुवार २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता व तालुका माहूर , हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगांव (खै), लोहा व मुखेड येथे २८ जुलै रोजी दुपारी ०४ वाजता संबंधित तालुक्याचे तहसीलदार…
Read MoreOBC Reservation: ओबीसी आरक्षण पुन्हा आलं, निवडणुकीचा मार्ग मोकळा, सत्तातरानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कायदेशीर लढा दिला होता. मात्र, यामध्ये त्यांना यश आले नव्हते. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार येताच अवघ्या काही दिवसांमध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे. काही…
Read Moreसंभाजीनगर नाही औरंगाबादच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराला दिली स्थगिती
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे हे सरकार पडणार असल्याचा अंदाज महाविकास आघाडीला आला होता. त्यामुळे त्यांनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले होते. (shinde government stay renaming of auranagaabad as sambhajinagar) त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात आले होते. तसेच नवी मुंबईच्या विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्यात आले होते. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता. Sambhajinagar not Aurangabad! Chief Minister Eknath Shinde has suspended the renaming of Aurangabad, Osmanabad…
Read Moreनेमकी खरी शिवसेना कोणती? धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ शकेल का?
राज्यात सध्या सुरू असलेलं सत्तानाट्य थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. बंडखोर आमदार, शिंदेगट व भाजपाची सत्तास्थापना, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधानसभेत झालेली बहुमत चाचणी या सर्व मुद्द्यांवर शिवसेनेनं थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेनं थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेत कॅव्हेट अर्ज दाखल केला आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ नये, यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात असलं, तरी शिवसेने हे वृत्त फेटाळलं आहे. shivsena political crisis over party symbol…
Read MoreOBC Reservation नवीन निवडणुका जाहीर करू नका; ओबीसी आरक्षण प्रकरणातील सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 19 जुलैला होणार
नवी दिल्ली – मागील अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहेत. महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र न्यायालयाने यावर आक्षेप घेत निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या होत्या. आता न्यायालयाने पुढील काळात नव्या निवडणुका जाहीर न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहे. (OBC Reservation news in Marathi) ओबीसी आरक्षण प्रकरणातील सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 19 जुलैला होणार आहे. तसेच ️ज्या ठिकाणी अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, त्या ठिकाणचे ओबीसी आरक्षण बांठिया आयोगाच्या…
Read Moreमहाराष्ट्रात शिंदेशाही , बहुमत चाचणी जिंकली!
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला. (cm eknath shinde bjp devendra fadanvis wins floor test maharashtra राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. (Floor Test in Maharashtra) महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर…
Read Moreमहाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड |Rahul Narvekar elected as Speaker of Maharashtra Legislative Assembly
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या ‘चाव्या’ आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. Rahul Narvekar elected as Speaker of Maharashtra Legislative Assembly नार्वेकर ते राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे…
Read Moreएकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई : गेल्या 10 दिवसांपासून राज्यात सत्तांतर होणार होणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर आज अखेर राज्याला नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा चेहारा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तर, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde First Reaction After Taking Oath Of Maharashtra CM) Eknath Shinde as Chief Minister while Devendra Fadnavis as Deputy Chief Minister Oath in Governer House शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा हा विजय…
Read Moreमोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार संपुष्टात | Uddhav Thackeray resigns as Chief Minister, Maha Vikas Aghadi government terminated
महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींनी वेग धरला आहे. विधानपरिषदेची निवडणूक संपली आणि राजकीय नेत्यांचे रस्ते रातोरात बदलले. शिवसेनेत मोठी फूट पडली आणि आता पर्यायाने सरकार पडणार, हे स्पष्ट झालंय. (Uddhav Thackeray News) यादरम्यान महाविकास आघाडीतही बैठकींचं सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावली असून सर्व मंत्री उपस्थित होते. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी मंत्रीमंडळाची ही शेवटची कॅबिनेट ठरली. आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra Political Crisis) Uddhav Thackeray resigns as Chief Minister, Maha Vikas Aghadi government terminated कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधन करत मोठा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा…
Read More