नांदेड (जिमाका), दि. 30 :- राज्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला असून यावर्षी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा ही कीड पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी व मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो. अळी देठ, फांदी व खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते व पुर्ण झाड वाळून जाते. वेळेवर उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. सोयाबीनवरील चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.यापद्धतीचा 15 दिवसातून जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या 30-35 दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन 50 टक्के, 30 मिली प्रति 10 लिटर अथवा थायक्लोप्रीड 21.7 एस. सी. 15 मिली प्रति 10 लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल 18.5 एस. सी. 3 मिली प्रति 10 लिटर अथवा थायमेथोक्झाम 12.6 टक्के अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड. सी 2.5 ग्रॅ. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
- Rainfall महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा: हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट |Heavy rain warning in Maharashtra: Meteorological Department issues red and orange alertमुंबई, 27 मे 2025: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला … Read more
- Monsoon arrived in Maharashtra | आनंदाचे वातावरण; यावर्षी महाराष्ट्रात १२ दिवस आधीच मान्सून दाखलयावर्षी महाराष्ट्रात १२ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा … Read more
- लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना या कारणांमुळे पुण्यश्लोक म्हणतातअहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी येथे मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई … Read more
- तंत्रस्नेही व अभ्यासू अशी ओळख असलेले शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची जालनावरुन बदलीजालना प्रतिनिधी | प्रत्येक वर्षी मे महिन्यात शासनस्तरावरुन सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय … Read more