राज ठाकरेंना उत्तर भारतातुन विरोध वाढला या १० राज्यांनी ही घातली प्रवेशांवर बंदी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. पण या दौऱ्याला एक भाजप खासदार विरोध करताना दिसून येत आहे. या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केला आहे. अयोध्येत येण्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर त्यांनी इथे यावे, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे. (10 states ban raj thackeray)राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्याला महाराष्ट्र भाजपनेही पाठिंबा दिला आहे. पण उत्तर प्रदेशातल्या भाजप खासदारानेच याला विरोध केल्यामुळे हा दौरा चर्चेत आला आहे. अशात हा वाद आता आणखीनच वाढल्याचे दिसत आहे.
खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंना विरोध केल्यानंतर आता आणखी काही उत्तर भारतातील राज्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही, तर १० राज्यांनी राज ठाकरेंवर बंदी सुद्धा घातली आहे. त्या सर्व राज्यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश राज्यातून राज ठाकरेंना विरोध होत आहे. असे असतानाच आता हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि उत्तराखंड अशा ९ राज्यांनी राज ठाकरेंच्या प्रवेशाला बंदी घातली आहे. या सर्व राज्यांनी राज ठाकरे माफी मागा अन्यथा राज्यांत पाऊल ठेऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच ब्रिजभूषण सिंग हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरेंविरोधात प्रचार करताना दिसून येत आहे. ५ लाख उत्तर भारतीय राज ठाकरेंना विरोध करायला येतील. माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश देणार नाही, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे.
तसेच माझा महाराष्ट्राला विरोध नाहीये. पण आमच्या लोकांना मनसेने खुप मारले आहे. मी त्याचा विरोध करत आहे. त्यामुळे मी राज ठाकरेंना माफी मागितल्याशिवाय इथे येऊ देणार नाही, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंना आपण विमानतळावरच थांबवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरल
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंत
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावा
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

