आधुनिक महाराष्ट्राचा निर्माता |The Maker of Modern Maharashtra |Vasantrao Naik

आधुनिक महाराष्ट्राचा निर्माता |The Maker of Modern Maharashtra |Vasantrao Naik

महाराष्ट्र भुमीचे उध्दारकर्ते श्री. वसंतराव नाईककांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती. नाईक कुटुंब – नाईकांचे मूळ आडनाव राठोड असे होते; परंतु गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंगाचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी होनूबाई यांना दोन मुले झाली, राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले.

शिक्षण : – वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली होती. तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहातुनच पुढे त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह वत्सलाबाई यांच्याशी झाला (१९४१). या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारान्ती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. त्यांची दोन्ही मुले निरंजन व अविनाश असून दोघेही सुविद्य आहेत.

कार्य : – वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (डिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय वसंतरावांकडेच जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.

कै. श्री. नाईक हे मुळात शेती करणारे होते. ते स्वत: शेतीविषयक पार्श्वभूमीचे असल्याने त्यांना शेतकर्‍याच्या दुर्दशाची जाणीव होती. त्याला त्यांचे अंधकारमय चित्र बदलायचे होते आणि त्यांनी शेती क्षेत्रावर जोरदारपणे लक्ष केंद्रित केले. खरं तर महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचा एजंट म्हणून सहकारी क्षेत्राचा तो पहिला प्रवर्तक होता. त्यांना “कसेल त्यची जामीन” या कल्पनेचा जन्मदाता म्हणून ओळखले जाते म्हणजे जमीन ही जोपासतो त्याच्या मालकीची होईल.

कै. श्री. व्ही. पी. नाईक हे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक सामाजिक-राजकीय वातावरण आणि भौतिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत होते. तो त्यांचे संगोपन कधीच विसरला नाही आणि म्हणूनच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी उत्सुकता ठेवली. कृषी क्षेत्राच्या विकासाच्या इच्छेने त्याचे हृदय भडकले होते. विशेषत: राज्यातील शेतकरी हितासाठी ग्रामीण महाराष्ट्र यावर त्यांचे नेहमीच लक्ष असते.
सिंगापूर येथे अखेरचा श्वास घेताना या महान मनुष्याचा दु: खद अंत 1968 साली झाला.

A true son of the soil, Sri. Vasantrao Naik was born in the small village of Gahuli, Yavatmal to a father Phoolsing and mother Haunaki Naik on 1st July, 1913. Gauhali, his birthplace, was a poor village lacking in the basic facilities and even primary education. However, the young, bright and ambitious man willingly moved to various nearby places in his quest to acquire education. His heart and soul were focused and dedicated towards the development of individual spirit and the benefit to society. It was with this indomitable spirit that he established, “Janta Shiskshan Prasarak Mandal” in Pusad. The Janta Shikshan Prasarak Mandal focuses on educating the natives from Primary Levels to the Higher Education in all most all the branches of knowledge.

Vasantrao, also known by his friends as V.P., entered the arena of politics in early 1951. His humble beginnings coupled with his strong perseverance saw a long and steady political progression in his career. He rose from a simple MLA to the Chief Minister of the State. His unique innings of almost a decade and half as a Chief Minister gave him an opportunity to lay down a strong foundation of today’s Modern Maharashtra. The credit of one of the most developed state in India goes to Late V.P.

Late Sri. Naik was an agriculturist to the core. Since, he himself was from an agricultural background, he was aware of the plight of the farmer. He wanted to change their gloomy picture and so focused strongly on the farming sector. In fact he was the first promoter of the Co-operative sector as an agent of rural growth in Maharashtra. He is known as the the originator of the idea of, “kasel tyachi jamin” which means that the land will belong to one who cultivates it.

Late Sri. V. P. Naik was instrumental in the creation of the necessary socio-political atmosphere and physical infrastructure for the growth of the agricultural sector. He never forgot his upbringing and so kept keen interest in developing agricultural sector. His heart was aflame with the desire to develop the agricultural sector. He always had a focus on rural Maharashtra  especially for the welfare of the farmers in the state.
The year 1968 saw the tragic end of this great man as he breathed his last at Singapore.

<

Related posts

Leave a Comment