टोकियो दि. 24 : जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली. 24 ते 8 ऑगस्ट या कालावधीत जपानमधील टोकियो शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी 18 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातून 126 खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करताना पाहायला मिळणार आहेत. यात महाराष्ट्रातील आठ खेळाडूंचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्यातील खेळाडूंमध्ये 6 खेळाडू 23 ते 8 ऑगस्ट दरम्यान मैदानात उतरतील. तर उर्वरित 2 खेळाडू पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी प्रतिनिधीत्व करणार आहेत. जाणून घेऊयात जागतिक स्तरावरील सर्वोच्च स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंसदर्भातील खास माहिती (This 8 Players From Maharashtra State will Participate in Tokyo Olympic)
टोकियो ऑलिंपिकमध्ये 126 खेळाडूंचा भारतीय संघ अठरा क्रीडाप्रकारात देशाला पदक जिंकून देण्यासाठी खेळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातून 1) राही सरनोबत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-25 मीटर पिस्तूल), 2) तेजस्वीनी सावंत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-50 मीटर). 3) अविनाश साबळ, बीड (खेळ-अॅथलेटिक्स 3000 मीटर स्टिपलचेस). 4) प्रविण जाधव, सातारा (खेळ-आर्चरी), 5) चिराग शेट्टी, मुंबई (खेळ-बॅडमिंटन पुरुष दुहेरी), 6) विष्णू सरवानन, मुंबई (खेळ-सेलिंग), 7) स्वरुप उन्हाळकर, कोल्हापूर (खेळ-पॅरा शुटिंग-10 मीटर रायफल), 8) सुयश जाधव, सोलापूर, (खेळ-पॅरा स्विमर-50 मीटर बटर फ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मिडले)
हे आठ खेळाडू देशाला ऑलिंपिक पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील. आपल्या उत्तम कामगिरीनं, खिलाडूवृत्तीनं राज्याचा, देशाचा गौरव वाढवतील, असा विश्वास आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या टोकीयो ऑलिंपिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो. ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत भारतीय संघातील खेळाडूंना, क्रीडा कार्यकर्त्यांना, क्रीडा रसिकांना टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या मन:पूर्वक शुभेच्छा…
हे ही वाचा ———–
- लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना या कारणांमुळे पुण्यश्लोक म्हणतातअहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी येथे मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई … Read more
- तंत्रस्नेही व अभ्यासू अशी ओळख असलेले शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची जालनावरुन बदलीजालना प्रतिनिधी | प्रत्येक वर्षी मे महिन्यात शासनस्तरावरुन सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय … Read more
- ‘खालिद का शिवाजी’ – समतेचा शोध घेणारा सामाजिक भान असलेला चित्रपटसध्या देशभरात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भांमध्ये जी अतिसंवेदनशीलता दिसून येते, त्या पार्श्वभूमीवर ‘खालिद … Read more
- कोरोना पुन्हा डोक वर काढ्तोय JN.1 ओमिक्रॉन व्हेरिएंट संसर्गाची गती, महाराष्ट्रातील परिस्थितीसध्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोविड-१९ ची प्रकरणे नवीन व्हेरिएंट्सवर लक्ष ठेवण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग सुरू आहे. … Read more
- स्वातंत्र्यवीर सावरकर टीकाकारांच्या निशाणावर का असतात? हे मुद्दे महत्त्वाचेविनायक दामोदर सावरकर, ज्यांना वीर सावरकर म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख … Read more