महाराष्ट्रसमाजकारण

दंगली घडवणाऱ्या रझा अकादमीवर कारवाई करा

Take action against Raza Academy for the violence

मुंबई : त्रिपुरा येथील कथित हिंसाचारानंतर महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात दंगली उसळल्या, याप्रकरणी जातियतेचे विष पेरणाऱ्या रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालावी तसेच पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

याबाबत अतुल भातखळकर म्हणाले, मुस्लिम जातीयतेचे विष पेरणाऱ्या रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालावी. काल नांदेड, मालेगाव, आमरावती या ठिकाणी रझा अकादमीने त्रिपुरातील न घडलेल्या घटनेवरुन सर्वसामान्यांच्या घरांची तोडफोड केली, पोलिसांना जखमी केले.Take action against Raza Academy for the violence

त्यामुळे या संघटनेवर तातडीने बंदी घालावी कारण हा यांचा इतिहास राहीलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांना आठवण करुन देऊ इच्छीतो २०१२ साली रझा अकादमीने घडविलेल्या दंगलीवरही आपण तेव्हा हीच मागणी केली होती. असे अतुल भातखळकर म्हणाले.Take action against Raza Academy for the violence

भातखळकर ट्विटमध्ये म्हणाले, धार्मिक दंगली घडविणाऱ्या रजा अकादमीवर कठोर कारवाई करण्यासोबतच कायमची बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली आहे. ते ही हिंमत दाखवतील अशी अपेक्षा आहे.Take action against Raza Academy for the violence

महत्वाच्या बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 12
  • Today's page views: : 12
  • Total visitors : 512,611
  • Total page views: 539,518
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice