दंगली घडवणाऱ्या रझा अकादमीवर कारवाई करा
Take action against Raza Academy for the violence

मुंबई : त्रिपुरा येथील कथित हिंसाचारानंतर महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात दंगली उसळल्या, याप्रकरणी जातियतेचे विष पेरणाऱ्या रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालावी तसेच पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
याबाबत अतुल भातखळकर म्हणाले, मुस्लिम जातीयतेचे विष पेरणाऱ्या रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालावी. काल नांदेड, मालेगाव, आमरावती या ठिकाणी रझा अकादमीने त्रिपुरातील न घडलेल्या घटनेवरुन सर्वसामान्यांच्या घरांची तोडफोड केली, पोलिसांना जखमी केले.Take action against Raza Academy for the violence
त्यामुळे या संघटनेवर तातडीने बंदी घालावी कारण हा यांचा इतिहास राहीलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांना आठवण करुन देऊ इच्छीतो २०१२ साली रझा अकादमीने घडविलेल्या दंगलीवरही आपण तेव्हा हीच मागणी केली होती. असे अतुल भातखळकर म्हणाले.Take action against Raza Academy for the violence
भातखळकर ट्विटमध्ये म्हणाले, धार्मिक दंगली घडविणाऱ्या रजा अकादमीवर कठोर कारवाई करण्यासोबतच कायमची बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली आहे. ते ही हिंमत दाखवतील अशी अपेक्षा आहे.Take action against Raza Academy for the violence
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..
- India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर
- आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!
- मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसान
- निसर्ग संवर्धनासाठी माहूरमध्ये होत आहे पर्यावरण संमेलन; अशी करा नाव नोंदणी