Monsoon | राज्या 9 ते 14 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा
Online Team | भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. (Mumbai rains live Maharashtra weather forecast update today heavy rain alert in Thane Raigad konkan pune monsoon by IMD and skymet mumbai local update)
यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेपेक्षा अधिक वेगात होत आहे. मान्सूनने हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाच्या पाच दिवसांपूर्वीच राज्यात तर तीन दिवसांपूर्वीच विदर्भात प्रवेश केला. हवामान खात्यानुसार १० ते १२ जून या काळात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे मान्सून १२ ते १४ जून या काळात विदर्भात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, हवामान खात्याचा राज्यासाठीच्या अंदाजानंतर आता विदर्भासाठीचाही अंदाज चुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात वादळी पावसाची हजेरी लागते आहे. अशातच मंगळवारी शहर तसेच विदर्भात दमदार पाऊस झाला. तर आज मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे हवामान खात्याने अधिकृतरित्या जाहीर केले. आज विदर्भ, गुजरात, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील काही भागात मान्सूनने प्रवेश केल्याचे खात्याकडून जाहीर करण्यात आले. पुढील तीन दिवसांत मान्सून पूर्व उत्तर प्रदेशापर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.
मुंबईत अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वेची वाहतूक विस्कळीत, किंग्ज सर्कलवर पाणी साचलं
अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वे विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत. सायन स्टेशन, किंग्ज सर्कल, अशा काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने निर्णय घेतला..
— हे ही वाचा —
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims राज्यातील अतिवृष्टीमुळे लाखों शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं. जमिनी वाहून गेल्या, विहिरी गाडल्या गेल्या, आणि
- India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर“I wanted to boxing him…”: Pakistani spinner Abrar Ahmed’s controversial statement on Shikhar Dhanu, angers Indian fans दुबई/मुंबई, ७ ऑक्टोबर २०२५ – एशिया कप २०२५
- आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!दुबई, 28 सप्टेंबर 2025: आशिया चषक 2025 (T20I स्वरूप) चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला. या ऐतिहासिक सामन्यात भारताने
- मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसानMarathwada Reels Under Torrential Rains and Floods: Massive Crop Damage Reported मुंबई, २ ऑक्टोबर २०२५: महाराष्ट्रातील मराठवाडा आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून मुसळधार
- निसर्ग संवर्धनासाठी माहूरमध्ये होत आहे पर्यावरण संमेलन; अशी करा नाव नोंदणीEnvironment conference organized at Mahur for nature conservation; presence of Padma Shri Shabir Mamu माहूर, १ ऑक्टोबर २०२५ – महाराष्ट्रातील पर्यावरणप्रेमींसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उदयास