मराठा आरक्षण

Maratha Reservation | चार वेळा पत्र लिहुन पंतप्रधान मोदींनी भेट दिली नाही,मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली रोखठोक भुमिका.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चार वेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण ?
असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

मराठाआरक्षण ⚔️🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 262
  • Today's page views: : 266
  • Total visitors : 499,769
  • Total page views: 526,187
Site Statistics
  • Today's visitors: 262
  • Today's page views: : 266
  • Total visitors : 499,769
  • Total page views: 526,187
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice