छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शक १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करून सार्वभौम राज्य घोषित केले. अनेक वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या मराठी प्रदेशात नवचैतन्य सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील अत्यंत विशद आणि अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती ही पदवी धारण केली. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान. राज्याचा कारभार आणि पदांचे वितरण यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सोयराबाईंना महाराणी आणि छत्रपती संभाजी राजे महाराजांना युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. This is the…
Read More