मी शेतकऱ्यांसाठी त्यांचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरेन; शेतकऱ्यांशी देखील गद्दारी करणारं हे सरकार आहे. -उद्धव ठाकरे

मी शेतकऱ्यांसाठी त्यांचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरेन; शेतकऱ्यांशी देखील गद्दारी करणारं हे सरकार आहे. -उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे : एका बाजूला दिवाळी सुरू आहे नि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं दिवाळं निघालं आहे. दिवाळी साजरी तर सोडून द्या. दिवाळीत कपडे कोणते घालायचे, अन्न काय शिजवणार हा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे. विरोधी पक्ष म्हणून आलेलो नाही. या शेतकऱ्याचं ऋण आपल्यावर आहे. कोरोना काळात आपल्या अर्थव्यवस्थेला या अन्नदात्याने आधार दिलेला आहे. कृषी क्षेत्राने दिलेला आहे. शेतकरी तेव्हा राबला नसता तर आपल्या आर्थिक स्थितीचेही दिवाळे निघाले असते. Inspected the damaged area of ​​Sambhajinagar district, discussed some important issues while talking to the media

https://youtu.be/hOTsvVxjQ_0

हल्ली जे बदलत वातावरण आहे त्यात पावसाळ्याची सुरुवात चक्रीवादळाने होते. त्यानंतर सतत धार, अतिवृष्टी, ढगफुटी होतात. गेल्या आठ दहा दिवसांत पुण्यामध्येही अतोनात पाऊस झाला. रस्ते तुंबले, घरात पाणी शिरले. त्यावर आपले उपमुख्यमंत्री म्हणाले, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. तसंच चिखल झाला आहे, सर्वत्र पाणी झाले आहे हे पाहून ते म्हणतील जसे शहरात पाऊस किती पडावा हे महापालिकेच्या हातात नसतं तसेच गावात, खेड्यात पाऊस किती पडणार हे सरकारच्या हातात नसतं.

अस्मानी संकट आल्यावर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचं नाही. त्याचं घरदार उघड्यावर पडता कामा नये. आज घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेन या कोरड्या सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. हे उत्सवी सरकार आहे. उत्सव मग्न सरकार. हा उत्सव तो उत्सव… उत्सव साजरे करा पण आपल्या राज्याची जनता समाधानी आहे की नाही, हे पाहणं त्या त्या राज्यकर्त्यांच, राज्य सरकारच काम आहे आणि हे सरकार त्यात अपयशी ठरत आहे.

ओला दुष्काळ नसल्याचं हे सरकार म्हणत आहे. त्यामुळे मी पाहणी करण्यासाठी आलो आहे. ही माझी प्रतीकात्मक भेट आहे. खरं काय खोटं काय ते तुमच्या माध्यमातून सरकारलाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला, देशाला कळू द्या. काही शेतकऱ्यांनी मला आता सांगितलं की त्यांच्याकडे रेशन घ्यायलाही पैसे नाहीत. तुम्ही जो शिधा वाटप करताहेत तो देखील शेकऱ्यांकडूनच येतोय. पण तो शिधा वाटपही होत नाहीय. त्यात घोटाळा झालाय, नाही झालाय हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

साधारणतः पन्नास हजार रुपये हेक्टर, अशी शेतकऱ्याची मागणी आहे आणि ती मागणी त्यांच्यावतीने मी सरकारकडे करत आहे. ही मनातली नाही जनातली मागणी आहे. पंचनामे कधी करणार? ते झाल्यानंतर तुमचे लंगडे घोडे दामटवणार… त्यात त्यांचं आयुष्य बरबाद होतंय. ओला दुष्काळ जाहीर करा किंवा नका करू. माझ्या शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे. त्यांनी केलेल्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे.

शिवसेना सतत आणि सतत तुमच्यासोबत आहे. मविआतले मित्र पक्षही आहेत. काळजी करू नका. धीर सोडू नका. काही करून आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. शेतकऱ्यांनी आता त्यांच्या हातातील आसूड आता वापरायला हवा. तो तुमच्याच हातात शोभून दिसतो. उगाच आम्ही हातात घ्यायचं नि फॅशन म्हणून फोटो काढायचा? तुम्ही दगडालाही पाझर फोडू शकता तर मग सरकारला का नाही. सरकारला घाम फुटला पाहिजे.

ज्यांना घरामध्ये सगळं दिल्यानंतरही घर सोडून बाहेर फिरताहेत, त्यांना शेतकऱ्याच्या घरातलं दुःख कसं काय कळणार?

शेतकऱ्यांशी देखील गद्दारी करणारं हे सरकार आहे.

मी आणि पंतप्रधानांनीही त्या काळात घरात बसूनच काम केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मिटिंगमध्ये आम्ही एनडीआरएफने दिलेल्या निकषाबद्दलही बोललो होतो. त्यांनी दिलेल्या निकषांपेक्षा अधिक मदत आम्ही त्यावेळी केली होती.

नीती आयोगाच्या बैठकीत आम्ही हा मुद्दा सतत मांडला होता. एनडीआरएफचे जुने निकष बदलायला हवेत. तसेच पीक विमा योजनेंतर्गत बीड पॅटर्न अमलात आणण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत होतो. आता हे सरकार पाठपुरावा या हंगामात होणार कि पुढच्या हंगामात ते शेतकऱ्यांना कळलं पाहिजे.

मी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा माणूस म्हणून, त्यांचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरेन.

<

Related posts

Leave a Comment