Pandarichi Wari | पंढरीची वारी म्हणजे अलौकिक आनंदाची अनुभूती
वारी पाहण्याचा , लिहीण्याचा विषय नाही . वारी अनुभवण्याचा विषय आहे . मुळात हा विषयच नसून एक अलौकिक अनुभूती आहे . काही महिन्याच्या बाळापासून ते वयाची नव्वदी अोलांडलेली सारी माणसं ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात एकरुप होऊन जातात . जात , पंथ , धर्माचे सारे भेद इथं गळून पडतात . इथल्या वाटेवर कोणीही कोणाला नावाने हाक मारत नाही . जोपर्यंत वारीच्या वाटेवर आहात तोपर्यंत तुमचं नाव केवळ ‘ माऊली ‘ आहे . इथं प्रत्येकजण एकमेकांना माऊली नावाने हाका मारतो . अोळखपत्र लागत नाही . चेहर्यावर विलसत असलेलं माऊलींच्या नामाचं हास्यच इथली अोळख !
माऊलींच्या आधी इथं ‘ एक गुरु – एक शिष्य ‘ परंपरा होती . गुरुने आपलं ज्ञान केवळ एकाच शिष्याला अाणि त्याने केवळ त्याच्याच शिष्याला द्यायचं . ही परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत आली . नाथांनी ज्ञानेश्वरांना ते ज्ञान सांगितलं . आणि ज्ञानोबांनी मात्र ; ते सार्या जगासोबत वाटलं . वारकरी सांप्रदायाचा पाया रचला . भेदाभेद महापाप मानलं . म्हणून माऊलींचा मान सार्या संतांमध्ये अधिक . माऊलींनी रचलेल्या ज्ञान आणि प्रेमाच्या मंदीराला तुकोबांनी कळस चढविला . म्हणून ज्ञानोबा – तुकाराम चा गजर होतो ह्या वाटेवर …
कोणाला आमंत्रण दिल्या जात नाही . भर पावसातही एखाद्या तरुण रक्ताला लाजवेल अशी पाऊलं खेळतात ही वृद्ध माणसं . कुठून येत असेल हे तेज ? हे तेज आहे भक्तीचं अाणि श्रद्धेचं . ईश्वर म्हटलं की , केवळ अंधश्रद्धा म्हणून पाहणार्या लोकांनी ह्या वृद्धांसोबत व्यतीत करावा काही काळ वारीच्या वाटेवर . आनंद म्हणजे काय ? भक्ती म्हणजे काय ? ह्या सार्यांची उत्तर मिळत जातील . वारी ही आपल्या आत होणारं परिवर्तन आहे . पंढरीसे जारे आल्यानो संसारा ॥ असं संत सांगतात त्यामागचं कारण भव्य आहे . हा काही दिवसांचा प्रवास सांगतो आपल्या आत्म्याला की , आहे ! आहे अजूनही ह्या विश्वात प्रेम , स्नेह , आपुलकी , दया आणि कैवल्य , साहस आणि विश्वास .. ह्या सार्या भावना वारीत प्रत्यक्ष कोणा न कोणाच्या रुपाने वावरतात . .
ह्यावर्षी वारीची वाट सुनीसुनी राहणार . काल जगद्गुरू तुकोबांचं प्रस्थान झालं . आज विश्वमाऊली ज्ञानोबांच प्रस्थान . मोजक्याच काही संताच्या पालखी ह्यावेळेस पंढरपुरात दाखल होतील . बा विठ्ठला ! लढण्यास बळ दे फक्त ..
स्वत:शी अोळख करुन घेण्यासाठी , वारीसारखा प्रवास दुसरा कोणता नाही .
———— हे ही वाचा ———–
- “मैत्रीचा सापळा आणि ३५० अश्लील व्हिडिओ; परतवाड्याच्या अयान अहमदचा ‘विकृत’ चेहरा समोर, संपूर्ण महाराष्ट्र सुन्न!”“The Paratwada Horror: 350 Explicit Videos Found as SIT Probes Ayan Ahmed’s Massive Blackmail Racket.” परतवाडा (अमरावती): अमरावती
- शिवराय सर्वांचे, फूट कुणाची? अंजनगाव वादातून महाराष्ट्राला धडा,अनधिकृत पुतळे, जातीय तणाव आणि शिवभक्तीची खरी परीक्षासोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद केवळ एका गावातील
- समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३१ दिवसांचे आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन पुर्णत्वाची प्रतीक्षा, भर उन्हाळ्यात ३३०० कर्मचारी ‘हक्क’साठी रस्त्यावरमुंबई, ८ एप्रिल २०२६ : महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या न्याय्य मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS) भरती
- ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळाजालना, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – जिल्हा परिषद जालना, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आज येथील यशवंतराव चव्हाण

