Pandarichi Wari | पंढरीची वारी म्हणजे अलौकिक आनंदाची अनुभूती
वारी पाहण्याचा , लिहीण्याचा विषय नाही . वारी अनुभवण्याचा विषय आहे . मुळात हा विषयच नसून एक अलौकिक अनुभूती आहे . काही महिन्याच्या बाळापासून ते वयाची नव्वदी अोलांडलेली सारी माणसं ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात एकरुप होऊन जातात . जात , पंथ , धर्माचे सारे भेद इथं गळून पडतात . इथल्या वाटेवर कोणीही कोणाला नावाने हाक मारत नाही . जोपर्यंत वारीच्या वाटेवर आहात तोपर्यंत तुमचं नाव केवळ ‘ माऊली ‘ आहे . इथं प्रत्येकजण एकमेकांना माऊली नावाने हाका मारतो . अोळखपत्र लागत नाही . चेहर्यावर विलसत असलेलं माऊलींच्या नामाचं हास्यच इथली अोळख !
माऊलींच्या आधी इथं ‘ एक गुरु – एक शिष्य ‘ परंपरा होती . गुरुने आपलं ज्ञान केवळ एकाच शिष्याला अाणि त्याने केवळ त्याच्याच शिष्याला द्यायचं . ही परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत आली . नाथांनी ज्ञानेश्वरांना ते ज्ञान सांगितलं . आणि ज्ञानोबांनी मात्र ; ते सार्या जगासोबत वाटलं . वारकरी सांप्रदायाचा पाया रचला . भेदाभेद महापाप मानलं . म्हणून माऊलींचा मान सार्या संतांमध्ये अधिक . माऊलींनी रचलेल्या ज्ञान आणि प्रेमाच्या मंदीराला तुकोबांनी कळस चढविला . म्हणून ज्ञानोबा – तुकाराम चा गजर होतो ह्या वाटेवर …
कोणाला आमंत्रण दिल्या जात नाही . भर पावसातही एखाद्या तरुण रक्ताला लाजवेल अशी पाऊलं खेळतात ही वृद्ध माणसं . कुठून येत असेल हे तेज ? हे तेज आहे भक्तीचं अाणि श्रद्धेचं . ईश्वर म्हटलं की , केवळ अंधश्रद्धा म्हणून पाहणार्या लोकांनी ह्या वृद्धांसोबत व्यतीत करावा काही काळ वारीच्या वाटेवर . आनंद म्हणजे काय ? भक्ती म्हणजे काय ? ह्या सार्यांची उत्तर मिळत जातील . वारी ही आपल्या आत होणारं परिवर्तन आहे . पंढरीसे जारे आल्यानो संसारा ॥ असं संत सांगतात त्यामागचं कारण भव्य आहे . हा काही दिवसांचा प्रवास सांगतो आपल्या आत्म्याला की , आहे ! आहे अजूनही ह्या विश्वात प्रेम , स्नेह , आपुलकी , दया आणि कैवल्य , साहस आणि विश्वास .. ह्या सार्या भावना वारीत प्रत्यक्ष कोणा न कोणाच्या रुपाने वावरतात . .
ह्यावर्षी वारीची वाट सुनीसुनी राहणार . काल जगद्गुरू तुकोबांचं प्रस्थान झालं . आज विश्वमाऊली ज्ञानोबांच प्रस्थान . मोजक्याच काही संताच्या पालखी ह्यावेळेस पंढरपुरात दाखल होतील . बा विठ्ठला ! लढण्यास बळ दे फक्त ..
स्वत:शी अोळख करुन घेण्यासाठी , वारीसारखा प्रवास दुसरा कोणता नाही .
———— हे ही वाचा ———–
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरलNew Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber; Family Dispute Videos Go Viral छत्रपती
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंतHeartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save Him छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज MIDC
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावाM Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout & National Security पंतप्रधान नरेंद्र मोदी
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेमुळे देशभरात उफाळलेल्या
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर लीक आणि

