भारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि भरण्यासाठी तपशीलवार सूचना परिशिष्ट-II मध्ये दिल्या आहेत. उमेदवारांना त्यांचे नोंदणी आणि अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तरीही चूक झाली आहे, उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, कारण अंतिम तारखेनंतर नोंदणी/अर्ज फॉर्म संपादित/दुरुस्त करण्याची संधी असेल. तीन दिवसांची संपादन/दुरुस्ती विंडो प्रदान केली जाईल. नोंदणी आणि संपादन/दुरुस्ती विंडोचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे: India Post Office Bharti posts 21413…
Read MoreMonth: February 2025
लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणा
मुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. Minister Aditi Tatkare made an important announcement regarding the Ladki Bahin Scheme. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची…
Read Moreशिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.
ज्या इतिहासापासून या देशातील महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा मिळते जीवन जगण्याला, राष्ट्राला, सैन्याला ऊर्जा मिळते. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची अनेक वेळा मोडतोड करताना तथाकथित इतिहास तज्ञ दिसत आहेत. अनेक घटना अशा आहेत की त्याचा जगाने आदर्श घेतला. महाराष्ट्रात मात्र त्यावर तथाकथित चिकित्सा करून जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला जातो. प्रेरणास्त्रोताला कशी हानी पोहचविल्या जाते हे या लोकांकडून होत आहे. असच एक वादग्रस्त वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी सुद्धा केलेले आहे. त्यावर महाराष्ट्रात तीव्रसंतपाची लाट निर्माण झाले आहे. What are the far-reaching consequences of Shiv traitor Rahul Solapurkar’s statement about the historical event of “liberation from Agra”?…
Read Moreजालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Annual gathering along with parents’ meet, child marriage awareness program organized at Kasturba Gandhi Vidyalaya in Jalna city न्युज प्रतिनिधी | जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन, पालक मिळवा व दहावी बारावीच्या मुलींना निरोप समारंभ असा बहुउद्देशीय कार्यक्रम दि. 04-02-2024 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात गटशिक्षणाधिकारी डॉ भरत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेला होता. विद्यालयाच्या गृहप्रमुख सपना देवकर यांनी उत्तम नियोजन केलेले होते सकाळी अकरा पासून संध्याकाळी पाच पर्यंत मान्यवरांचे मार्गदर्शन, मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, बाल विवाह, अंधश्रद्धा प्रबोधन विषायवर एकांकिक, पालक मेळावा अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल यामध्ये दिसून आले.…
Read Moreअंजली बदनामिया यांनी माझ्यावर केलेले कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप खोटे धनंजय मुंडे यांचा पलटवार
मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आलेली आहे. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासनामार्फत निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले संपूर्ण आरोप हे धादांत खोटे असून केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले आहेत. Dhananjay Munde’s counter-attack against Anjali Damania’s false accusations against me regarding purchase of agricultural materials scam…
Read MoreAnjali Damania On Dhananjay Munde|धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री काळात मोठा भ्रष्टाचार, अव्वाच्या सव्वा किमतीला वस्तू खरेदी करून शासनाला 245 कोटींचा चुना
Anjali Damania On Dhananjay Munde| Big corruption during Dhananjay Munde’s agriculture minister, 245 crores lime to the government by buying goods at twice the market price. काल ट्विटरवर सांगितल्याप्रमाणे अंजली दमानिया यांनी तात्कालीन कृषी मंत्री व व आत्ताचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री काळातील कामकाजासंदर्भात केलेल्या अनेक खरेदी मध्ये वित्तीय नियमावली डावलून आर्थिक अपरातफर झाल्याचे खुलासे करण्यासाठी आज अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठे आरोपांचे गौप्यस्फोट केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना जवळपास 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.धनंजय…
Read More