कृषी प्रक्रिया, कृषि मुल्यसाखळी बळकटीकरण व कृषी मालाची विक्री व्यवस्था निर्मिती – कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

मुंबई, दि.३ : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची विक्री, मुल्यसाखळीचे बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी येथे सांगितले. कृषि हवामानानुसार विविध पिकांचे क्लस्टर विकसीत करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी प्रक्रिया, कृषी मुल्यसाखळी बळकटीकरण व कृषि मालाची विक्री व्यवस्था बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी मंत्रालयात कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार, कृषि संचालक सुभाष नागरे, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नानाजी…

Read More