अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता अहमदनगर शहर तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येईल. Cabinet Decision- Government of Maharashtra.…
Read MoreCitizenship Act CAA Notification issued in India | नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारतात लागू
नवी दिल्ली: सरकारने सोमवारी संध्याकाळी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, किंवा CAA साठी अधिसूचना जारी केली, जी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी आजपासून लागू होईल. कार्यकर्ते आणि विरोधी राजकारण्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2019 मध्ये CAA ला संसदेने मंजुरी दिली. आता अधिसूचना जारी करण्यात आली आहे, केंद्र सरकार हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, जैन किंवा ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींना – बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून – 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या व्यक्तींना नागरिकत्व देऊ शकते. Citizenship Act CAA Notification issued in India धार्मिक छळापासून पळ काढण्यासाठी. 2019 च्या निवडणुकीपूर्वी सीएएची अंमलबजावणी हे…
Read Moreशिंदेच्या आमदारांची मारामारी महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले.
विधीमंडळाचा आज शेवटचा दिवस असतनाच आज शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच पक्षातील हे आमदार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले. Shinde’s MLAs clashed with Mahendra Thorve and Minister Dada Bhuse. यावेळी भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली. दरम्यान याबाबत महेंद्र थोरवे यांनी माहिती दिली आहे. Minister Dada Bhuse Aamdar mahendra thorve fighting In assembly house यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही प्रमाणिकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. माझं दादा भुसे यांच्याशी…
Read MoreMaratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेस
मुंबई व अंतरवली सराटी|आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर सस्पेन्स वाढणार की मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटणार या संदर्भात पत्रकार परिषदा घेतल्यामुळे नेमकं काय घडलं वाचा मराठा समाजाचे (Maratha reservation) मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा (State Backward Commission report Maharashtra) अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठ समाजाला (Maratha aarakshan) कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी (OBC) किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी…
Read MoreMaratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारले
आंतरवली सराटी (जि. जालना) | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कालपासून जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचं त्यांच्याबरोबर असलेल्या आंदोलकांनी सांगितलं. नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं आणि प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रासह त्यांच्या सगेसोयऱ्यांचा आरक्षणात समावेश करावा, तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या…
Read Moreशिंदे सरकारने जरांगे पाटीलना धोका दिला? यामुळे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण
मराठा आरक्षण बाबत जे अध्यादेश व मसुदा शासनाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस घ्यावे, शासनाने सगे सोयरे यांचा कायदा पास करावा, विधिमंडळाचे दोन दिवसात अधिवेशन घ्यावे, हैद्राबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्विकारावे, आदी मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे शनिवार ता. 10 रोजी मनोज जरांगे हे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण करत आहे. Manoj Jarange Patil’s fast to death for the third time in six months by passing the law of Sage Soyre and implementing the ordinance या वेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना मनोज जरांगे यांनी…
Read Moreअभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात नवं वळण; मॉरिसने गोळ्या झाडल्या की दुसऱ्या कुणी घटना संशयास्पद
Abhishek Ghosalkar | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. दहिसर येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांची गुरूवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांची हत्या स्वयंघोषित नेता आणि स्थानिक गुंड अशी ओळख असलेल्या मॉरिस नरोनाने केली. हत्येनंतर आरोपीने देखील स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. New twist in Abhishek Ghosalkar murder case; If Morris shot someone else, the incident is suspicious अभिषेक घोसाळकर यांना गोळीबारानंतर जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्यूशी झुंज…
Read Moreनिखिल वागळेची ही चुक भवली … त्यांच्यावर पुणे येथे “निर्भय बनो” कार्यक्रमाला येताना प्राणघातक हल्ला
पुण्यात आज (9 फेब्रुवारी) राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी निखिल वागळे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण हा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी पुण्यातील काही भाजप नेत्यांनी दिली होती. Journalist Nikhil Wagle assaulted at Nirbhay Bana program in Pune दरम्यान, पुण्यात आज दुपारपासून निखिल वागळेंवर भाजपने जोरदार आंदोलन सुरू होतं. मात्र, संध्याकाळी कार्यक्रमस्थळी निखिल वागळे यांची कार येताच भाजप कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी वागळेंच्या कारवर जोरदार हल्ला केला. एवढंच नव्हे तर शाईफेक देखील करण्यात आली. Journolist Nikhil wagle Attack…
Read MoreAnil Babar Passed Away | यामुळे ‘ टेंभू योजनाचे शिल्पकार ’ आमदार अनिल बाबर यांचं निधन
MLA Anil Babar, the architect of the Tembhu scheme, passed away शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज सकाळी (31 जानेवारी) आकस्मिक निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणात हळहळ व्यक्त केली जात आहे. अलीकडेच त्यांनी सांगली येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शरद पवारदेखील उपस्थित होते. अनिल बाबर येथे येताच त्यांना जयंत पाटील यांनी बसण्यासाठी जागा दिली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकारणातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. Anil Babar Passed Away…
Read MoreChagan bhujbal On Maratha Reservation | ओबीसीवर अन्याय करून सरकार जरांगे यांचे हट्ट पुरवण्याचे काम करतंय
मुंबई ः माझी भूमिका ठरली आहे. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतोय. मराठे आता ओबीसीचे हक्कदार झालेत असे दिसतेय. मी मांडत असलेली भूमिका ही माझी भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीसाठी लढतोय ठरत राहणार असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मी एका जातीसाठी काम करत नाही तर अनेक जातीसाठी काम असल्याचे भुजबळ म्हणाले. मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे, त्या पाश्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, मराठे आता ओबीसीचे वाटेकरी झाले आहेत. शिंदे कमिटीचे काम काय, कशाला चालू ठेवा. ओबीसीचे आरक्षण संपल्याची आता लोकांत भावना निर्माण झाली…
Read More