जालना प्रतिनिधी | प्रत्येक वर्षी मे महिन्यात शासनस्तरावरुन सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्यांचे जिल्हा परिषद जालना येथील दोन्ही प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय नियमानुसार कालावधी संपुष्टात आल्याने बदल झाल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांची पुणे येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून तर मंगल धुपे यांची जळगाव येथील जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. दरम्यान कैलास दातखिळ यांच्या जागी माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पालघरच्या श्रीमती संगीता चंद्रकांत भागवत या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदलून येत आहेत. या संदर्भातील आदेश शासनस्तरावरुन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव यांनी दिनांक 30 मे रोजी निर्गमित झाले आहेत.
कैलास दातखिळ यांनी 2013 एमपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या शिक्षणाधिकारी पदासाठीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्या अनुषंगाने राज्यभर त्यांच्याकडे एक अभ्यासू शिक्षणाधिकारी म्हणून ओळखले जायचे. तसेच सामान्य शिक्षकांत डायरेक्ट संपर्क असल्याने त्यांच्या काळात शिक्षकांची वैयक्तिक कामे होताना कुठलीही आडवनूक होत नव्हती असे सामान्य शिक्षकातून बोलल्या जात आहे.Education officer Kailash Datkhil, known for being tech-savvy and studious, has been transferred from Jalna.
सहा हजार प्राथमिक शिक्षकाचे प्रशासकीय नेतृत्व करणारे तसेच शासन स्तरावरून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय आदेश परिपत्रके यांचा सखोल अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये दातखीळ यांचा हातखंडा होता. तसेच सध्या प्रशासन व शैक्षणिक कामांमध्ये येणाऱ्या नवनवीन पोर्टल वेबसाईट किंवा तांत्रिक बाबी स्वतः हातळत त्याची अंमलबजावणी करण्यात अग्रेसर असायचे.
प्रशासन चालवत असताना प्रशासकीय पातळीवर सहाहजार लोकांची आस्थापना सांभाळत असताना साहजिकच काही कमी जास्त झाल्यास नाराजीचा सूर त्यांच्या विरोधात उभा राहिल्याचं दिसून आले. तर जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा -ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीची झळ त्यांना सहन करावी लागली. परंतु त्यांच्या कृतीतून कधीही भेदभाव जाणवला नसल्याचं सामान्य शिक्षकांत बोलले जाते. अनेक शिक्षक संघटनानी त्यांची भेट घेऊन निरोप देणार असल्याचे सांगितले.