पुणे : सततच्या प्रतिक्षेनंतर मोसमी पाऊस अखेर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झाला आहे. आज रविवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अलिबाग, सातारा, पुणे भागात मोसमी पाऊस पोचला. देशात पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातील सिक्कीमपर्यत हा पाऊस पोचला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. दरम्याण चोवीस तासाच महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पावसाळा सुरु झाला की साधारण 7 जुनला पाऊस सुरुच होतो असा जुन्या काळात कयास होता. त्याच अनुषंगा खरिपातील पेरणीची तयारी केली जायची. मोसमी पावसाचा हा सामान्य जाणकार शेतकऱ्यांचा अंदाजही खरा ठरायचा. आलिकडच्या काही वर्षात मात्र हे अंदाज चुकु लागले आहेत.
यावर्षी मोसमी पाऊस २१ मे रोजी अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले होते. त्यानंतर नियमित वेळेच्या (१ जून) दोन दिवस उशिराने दक्षिण केरळात दाखल झाला. अरबी समुद्राकडून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली.
नेहमीपेक्षा चार दिवस आधीच म्हणजे आज रविवारी पुण्यात हजेरी लावली. मुंबईत मात्र अद्यापही मॉन्सून दाखल झालेला नाही. पुण्यासह मुंबईत मॉन्सून साधारणतः १० जून रोजी दाखल होतो असा अलिकडचा अनुभव आहे, देशातही रविवारी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम पर्यत मोसमी पाऊस पोचला आहे. मोसमी पाऊस दाखल होत असल्याच्या हवामान खात्याच्या वार्तेने शेतकरी खुश झाले आहेत. आता बहूतांश ठिकाणी पेरणीची तयारी सुरु आहे.
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state? चालू मान्सून हंगामात महाराष्ट्रात… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय वळण घेतले… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी सायंकाळी साखरपुड्याच्या… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
———–
