Advice to farmers | Groundnut, mug, urad, maize, bajra are beneficial
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि. अहमदनगर) ः महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन झालेय. पेरण्याची तयारी सुरु आहे. चांगला आणि पुरेसी ओल तयार करणारा पाऊस झाला की पेरणी करावी असा कृषीतज्ज्ञ सल्ला देत आहेत. खरिप पेरणी करण्यासाठी भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी कोणते वान चांगले आहेत याबाबत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे.
भुईमुगासाठी जमीन: मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत: एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या द्याव्यात. खरिप पेरणीसाठी एस बी-११, जे एल-२४ (फुले प्रगती), टी अे जी-२४, जे एल-२२० (फुले व्यास), जे एल-२८६ (फुले उनप), टी पी जी-४१, टी जी-२६, जे एल-५०१, फुले आर एच आर जी-६०२१, फुले उन्नती, जे एल-७७६ (फुले भारती) या वाणांची निवड करावी.
मूग व उडीदासाठी जमीन: मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. पूर्वमशागत: चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडीदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. मूगामध्ये वैभव व बी पी एम आर-१४५ हे दोन वाण भुरी रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत. खरिप पेरणीसाठी उडीदाचे टी पी यू-४ व टी ए यू-१ हे वाण वापरावेत.
बाजरीसाठी पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु हा ६.२ ते ८ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते. पूर्वमशागत करताना जमिनीची १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रती हेक्टरी ५ टन / १० ते १५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे. खरिपासाठी संकरीत: फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती व सुधारित: धनशक्ती वानाची पेरणी करावी.
मकासाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची जमीन पूर्वमशागत: एक खोल नांगरट, २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन १० ते १ टन प्रती हेक्टरी शेणखत/ कंपोस्ट खत यांचवेळी शेतात मिसळून घ्यावे. हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत/ कंपोस्ट खताची जरूरी नसते असे विद्यापीठातून सांगितले आहे.
–——हे ही वाचा——-
- AI तंत्रज्ञानामुळे Microsoft कंपनीने कर्मचाऱ्यांना layoff कामावरून काढून टाकल्याची चर्चा भारतात जोरदार सुरू आहेमंगळवारी मायक्रोसॉफ्टने सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली, जी त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ३% आहे, There is currently a…
- India-Pakistan conflict | संघर्षाची ८० वर्षे, हा आहे भारत-पाक फाळणी पासून इतिहासनवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन राष्ट्रांमधील भू-राजकीय तणाव नाही, तर तो ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक मतभेदांच्या…
- भारत-पाक युद्धानंतर राफेल बाबत जगभरात चर्चा |Rafale fighter jet, A weapon of the Indian Air Forceराफेल हे एक आधुनिक आणि बहुमुखी लढाऊ विमान आहे, ज्याचा वापर भारतीय हवाई दलाने भूतकाळात अनेक महत्त्वाच्या प्रसंगी केला आहे. भविष्यात…
- Republic of Balochistan announced| पाकिस्तान पुन्हा फुटला, नवा देश निर्माण, बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित?बोलचिस्तान स्वातंत्र्य चळवळ (Balochistan Freedom Movement) ही बलुच लोकांची स्वातंत्र्य किंवा स्वशासन मिळवण्यासाठीची चळवळ आहे, जी मुख्यतः पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात चालते.…
- MP Minister Vijay Shah controversy | कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बद्दल मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहा यांचे वादग्रस्त वक्तव्यऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सशस्त्र दलातील दोन महिला सार्वजनिक चेहऱ्यांपैकी एक असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशचे भाजप मंत्री कुंवर…