Advice to farmers | Groundnut, mug, urad, maize, bajra are beneficial
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि. अहमदनगर) ः महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन झालेय. पेरण्याची तयारी सुरु आहे. चांगला आणि पुरेसी ओल तयार करणारा पाऊस झाला की पेरणी करावी असा कृषीतज्ज्ञ सल्ला देत आहेत. खरिप पेरणी करण्यासाठी भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी कोणते वान चांगले आहेत याबाबत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे.
भुईमुगासाठी जमीन: मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत: एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या द्याव्यात. खरिप पेरणीसाठी एस बी-११, जे एल-२४ (फुले प्रगती), टी अे जी-२४, जे एल-२२० (फुले व्यास), जे एल-२८६ (फुले उनप), टी पी जी-४१, टी जी-२६, जे एल-५०१, फुले आर एच आर जी-६०२१, फुले उन्नती, जे एल-७७६ (फुले भारती) या वाणांची निवड करावी.
मूग व उडीदासाठी जमीन: मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. पूर्वमशागत: चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडीदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. मूगामध्ये वैभव व बी पी एम आर-१४५ हे दोन वाण भुरी रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत. खरिप पेरणीसाठी उडीदाचे टी पी यू-४ व टी ए यू-१ हे वाण वापरावेत.
बाजरीसाठी पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु हा ६.२ ते ८ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते. पूर्वमशागत करताना जमिनीची १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रती हेक्टरी ५ टन / १० ते १५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे. खरिपासाठी संकरीत: फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती व सुधारित: धनशक्ती वानाची पेरणी करावी.
मकासाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची जमीन पूर्वमशागत: एक खोल नांगरट, २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन १० ते १ टन प्रती हेक्टरी शेणखत/ कंपोस्ट खत यांचवेळी शेतात मिसळून घ्यावे. हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत/ कंपोस्ट खताची जरूरी नसते असे विद्यापीठातून सांगितले आहे.
–——हे ही वाचा——-
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी सायंकाळी साखरपुड्याच्या वऱ्हाडातील भरलेल्या टेम्पोला… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध केमिस्ट्री शिक्षक आणि आरसीसी कोचिंगचे… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणअंतरवाली सराटी (जालना), १७ मे २०२६: मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला २९ मे २०२६… Read more: मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
- बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरूपुणे/नागपूर, १७ मे २०२६ (महाराष्ट्र व्हॉइस): भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) ने सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) सक्रिय झालेल्या कमी… Read more: बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरू
- NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यातनवी दिल्ली/पुणे, १७ मे २०२६: देशभरातील MBBS, BDS सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET-UG २०२६ परीक्षेत मोठ्या प्रमाणावर पेपर लीक… Read more: NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
