मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा अखेर संपल्या आहेत. आता या स्पर्धेची सांगता झाली आहे. टोक्योच्या नॅशनल स्टेडियममध्येटोकियो ऑलिम्पिक 2020 खेळांची सांगता झाली. भारताने या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत 19 पदकं खिशात घातली. हे भारताचं आतापर्यंतच सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. हे भारताचं आतापर्यंतच सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. Tokyo olympics 2020 concludes, ‘This’ country wins most medals, India’s 5 gold medal winners
पदक मिळवण्याचा विचार करता चीनने सर्वाधिक पदकं खिशात घातली. चीन देशाने तब्बल 207 पदकांवर आपलं नाव करत दुहेरी शतक झळकावलं. पदक टॅलीमध्ये चीन टॉपवर राहिला. त्यांनी 96 सुवर्ण, 60 रौप्य आणि 51 कांस्य पदकं मिळवली. तर दुसऱ्या स्थानावर ग्रेट ब्रिटेन आहे. दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या ग्रेट ब्रिटेनने 124 पदकं पटकावली आहेत. त्यांनी 41 सुवर्ण, 38 रौप्य आणि 31 कांस्य पदक मिळवली आहेत.तिसऱ्या स्थानावर अमेरिका असून 37 सुवर्ण, 36 रौप्य आणि 31 कांस्य पदकासह त्यांची पदक संख्या 104 आहे. तर अमेरिकेपेक्षा सुवर्णपदकं कमी असणाऱ्या रशिया पॅरालिम्पिक कमिटीला 118 पदकांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. तर 59 पदकांसह नेदरलँड पाचव्या स्थानावर आहे.
या पदकांच्या शर्यतीत भारत 19 पदकांसह 24 व्या स्थानावर विराजमान आहे. भारताने 5 सुवर्णपदकं, 8 रौप्य पदकं आणि 6 कांस्यपदकांसह हे स्थान मिळवलं आहे. आतापर्यंच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा कधी आहेत? पाहा भारतीय खेळाडूंच्या स्पर्धांचं वेळापत्रक
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत 120 पेक्षा जास्त भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, टेनिस यांसारख्या खेळप्रकारांमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसतील.
भारतीय खेळाडूंचे सामने नेमके कधी आहेत. कोणत्या दिवशी कोणत्या खेळप्रकारातील सामना होईल, याची सर्व माहिती तुम्हाला या खाली मिळेल. Tokyo olympics 2020 concludes, ‘This’ country wins most medals, India’s 5 gold medal winners
1) मीराबाई चानू – भारोत्तोलन – रौप्य पदक (महिला 49 किलो)
टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी भारताला पहिले पदक मिळाले होते. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने देशाला पहिलं पदक मिळवून दिलं. मीराबाईने एकूण 202 किलो वजन उचललं. या प्रकारात चीनच्या होउ झिहुईने सुवर्णपदक, तर इंडोनेशियाच्या विंडी असाहने कांस्य पदक जिंकले.
2) पी.व्ही. सिंधू – महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक
कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिआओ हिचा पराभव करत देशाला दुसरे पदक जिंकून दिले. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले. याआधी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते, अशी कामगिरी करणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे.
3) लव्हलिना बोर्गोहेन – महिला वेल्टरवेट बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक
युवा बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने देशाला तिसरे पदक मिळवून दिले. उपांत्य फेरीत तिला तुर्कीच्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बुसानाजने पराभूत केल्याने तिचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. यासह ती भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी तिसरी बॉक्सरही ठरली आहे.
4) भारतीय हॉकी संघ – पुरुष हॉकी स्पर्धेत कांस्य पदक
भारताच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करून 41 वर्षानंतर पदक जिंकले. भारताचे हे ऑलिम्पिकमधील हॉकीचे 12वे पदक ठरले. याआधी भारतीय पुरुष हॉकी संघाने 1928 ते 1980च्या ऑलिम्पिकपर्यंत आठ सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत.
5) रविकुमार दहिया – पुरुष (57 किलो वजनी गट) कुस्तीमध्ये रौप्य पदक
कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक ठरले. फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने रवीकुमारचा पराभव केला. त्यामुळे सुवर्ण पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
6) बजरंग पुनिया – पुरुष (फ्रीस्टाइल 65 किलो वजनी गट) कांस्य पदक
कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो गटात देशाला कांस्य पदक जिंकून दिले. कांस्य पदकाच्या लढतीत बजरंगसमोर कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव्हचे आव्हान होते. बजरंगने दौलतवर 8-2 असा विजय मिळवत कुस्तीत यंदाचे दुसरे पदक जिंकले. आतापर्यंत भारताने कुस्तीत सात पदके जिंकली आहेत. खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये , कांस्य पदक जिंकत कुस्तीचे पहिले पदक जिंकले होते. त्यानंतर सुशीलकुमार (2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक), योगेश्वर दत्त 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक), साक्षी मलिक (2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक), रवीकुमार दहिया (2020 टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक) यांनी पदके जिंकली आहेत.
7) नीरज चोप्रा – पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक (ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक)
भालाफेकपटू नीरज चोप्राने 87.58 मीटर भाला फेकत सुवर्णपदक निश्चित केले. यासह भारताला 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले. यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याची भारतीयांची इच्छा नीरजने पूर्ण केली. यासह अॅथलिटिक्समध्ये पहिलेवहिले पदकही त्याने मिळवून दिले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. Tokyo Olympics 2020 concludes, ‘This’ country wins most medals, India’s 5 gold medal winners
========================================================================================
- सुवर्ण क्रांतीचे जनक हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘मंत्री’ पदाचा दर्जामाहूर : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे)सुवर्ण क्रांतीचे जनक हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सुरु झालेल्या मा. बाळासाहेब…
- Big Boss Marathi Arya Slaps Nikki |आर्याने निक्कीला मारली कानाखाली, आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यातील भांडण.बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात Big Boss Marathi Arya Slaps Nikki स्पर्धकांमधील तणाव आणि…
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेतमहाराष्ट्रातील 2022 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी असलेल्या पूजा खेडकर, तिच्या अधिकाराची मर्यादा…
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज30 जुलै, मंगळवार रोजी चॅटॉरॉक्स नेमबाजी केंद्रात 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत पदक…
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णयमुंबई, दि. २२:- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास…